Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Breaking»
    Breaking

    newstoday24By newstoday24February 24, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शरद पवार यांना आज शिवाजी महाराज आठवले…राज ठाकरे यांचा टोला

    मनसेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी शाखा अध्यक्षांपर्यंत बैठक झाल्या आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडी या ठिकाणी बैठक झाल्या आहेत.लोकसभा आणि विधासभेच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी चाचपणी सुरू आहे. परंतु आजच्या राजकारणात सर्व ठिकाणी चिखल झाला आहे.

    मुंबई | शरद पवार यांनी आतापर्यंत कधी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले नाही. आता त्यांना छत्रपती आठवत आहेत. शरद पवार यांना आज रायगडाची आठवण झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतल्यामुळे मुसलमानाची मते जातात, असे त्यांना वाटत होते. शरद पवार यांची मुलाखत मी मागे घेतली होती. त्यावेळी त्यांना विचारले होते की, तुम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. कधी शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाही, असा मनसे नेते राज ठाकरे यांनी म्हटले. शरद पवार यांना निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिले. या चिन्हाचे रायगडावरुन अनावरण करण्यात आले. त्यासंदर्भात राज ठाकरे बोलत होते. शरद पवार यांना तुतारी चिन्ह मिळाले मग काय करायचे. तुतारी फुंका, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले.

    निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका
    आमच्या शाखा अध्यक्षांपर्यंत बैठक झाल्या आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडी या ठिकाणी बैठक झाल्या आहेत. लोकसभा आणि विधासभेच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी चाचपणी सुरू आहे. परंतु आजच्या राजकारणात सर्व ठिकाणी चिखल झाला आहे. मागे एका कार्यक्रमात गेलो तेव्हा कोण कुठल्या पक्षाचा आहे हे कळाले नाही. कारण कधी कोण अजित पवार गटात असतात तर कधी शरद पवार गटात असतात.

    मराठा आरक्षणावर तसेच झाले ना
    मराठा आरक्षणावर मी बोललो होतो. आता तसेच झाले ना? मी जे बोलतो ते तुम्हाला नंतर पटते. माझ्या काळ्या केसांवर जाऊ नका, असा टोला राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणातील चाणक्यांना लगावला. आता मतदारांनी या लोकांना धडा शिकवला पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहिल्यावर महाराष्ट्र २०१९ नंतर जे होत आहे ते योग्य नाही. यामुळे नवीन युवक राजकारणमध्ये येणार नाही. कुणासोबत व्यासपीठावर गेलो म्हणजे युती होत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

    निवडणूक ईव्हीएमवर घेण्याबाबत राज ठाकरे यांनी विरोधी सूर व्यक्त केला. जगभरात पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घेतले जात आहे. परंतु आपण ईव्हीएमवर मतदान घेत आहे. ईव्हीएमवर मतदान झाले की नाही? हे ही कळत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

    #Breaking #Update #News #Ncp
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleएसटीचा सहा महिने करता येणार मोफत प्रवास, कोण ठरणार पात्र
    Next Article  कोणालाच नाही माहिती गौतमी पाटील हिचं खरं नाव, स्वतःच केला खुलासा
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.