Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Breaking»
    Breaking

    newstoday24By newstoday24February 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मराठा आंदोलनाचं षडयंत्र कारखान्यात? राजेश टोपे यांच्या खुलाश्याने मोठी खळबळ

    मुंबई : मराठा आक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंंभीर आरोप केले होते. एकेरी उल्लेख करत फडणवीसांना सागर बंगल्यावर येण्यार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरकारनेही कठोर भुमिका घेत जमावबंदीचे आदेश दिले. आज विधीमंडळ्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. त्यासोबतच जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा आहे. राजेश टोपे यांच्या कारखान्यामध्ये षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला. या सर्व आरोपांवर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

    गरीब मराठा समाजाचं कल्याण व्हावं याच उद्देशाने हा लढा मनोज जरांगे यांनी सुरू केला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा पूर्व इतिहास पाहिला तर मागील अनेक वर्षांपासून शिबवा नावाच्या संघटनेसाठी अनेक वर्षे काम करत आहेत. मी जालनाचा पालकमंत्री असताना मनोज जरांगे यांनी 105 दिवसांचं सर्वात मोठं उपोषण केलं होतं. आमच्या हुतात्म पत्कारलेल्या मुलांना दहा लाख आणि नोकऱ्या देण्याचं मान्य केलं होतं, त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. पैसे कधी मिळणार याची विचारणा केली होती. यामध्ये काही साखळी तर आमरण उपोषण होतं. त्यावेळी मविआचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण समितीचे अध्यक्ष होते तेव्हा यांची भेट घालून दिली होती. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांशीच बोलणार असल्याचं जरांगे म्हणाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर मनोज जरांगेंना वेळ देत हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते. मला हेच सांगायचं आहे की जरांगे आताच नाहीतर आमचं सरकार असल्यापासून उपोषण करत असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

    माझ्या भागात एखाद आंदोलन सुरू असेल तर त्या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून माणुसकीच्या नात्याने मी पाण्याची किंवा नाष्ट्याची सोय केली होती. हे समाजबांधवाप्रती असलेलं प्रेम असतं. यातील महत्त्वाचा भाग असा की कोणत्याही मोर्चा वेळी किंवा आंदोलनावेळी आपण माणुसकी विसरायची नसते हे मला सांगायचं आहे, असं राजेश टोपी यांनी सांगितलं.

    दरम्यान, जो काही संशय व्यक्त करण्यात आला आणि जे काही आरोप करण्यात आले हे धादांत खोटे आहेत. माझ्यावरील दगडफेकीचे आरोपही खोटे आहेत. माझ्यावरील आरोपांमध्ये कोणतीही सत्यता नाही. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. जरांगे यांचा कोणत्याही पक्षासोबत काही संबंध नाही, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

    #Breaking #BJP #Maratha
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअमोल कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी भाजप आमदाराने दंड थोपटले; म्हणाले, शिरूरमध्ये…
    Next Article अहमदनगर ब्रेकिंग : नगर जिल्ह्यातील आणखी १५ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या…
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.