Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»पाणी जपून वापरण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन : माझी वसुंधरा अभियानांतर्गत पाणी बचतीचा संदेश
    Ahmednagar

    पाणी जपून वापरण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन : माझी वसुंधरा अभियानांतर्गत पाणी बचतीचा संदेश

    newstoday24By newstoday24April 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाणी जपून वापरण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन : माझी वसुंधरा अभियानांतर्गत पाणी बचतीचा संदेश

    अहमदनगर : जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील जलसाठ्यांची कमतरता विचारात घेऊन जलसंपदा विभागाने पाणी पुरवठ्यामध्ये 20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या पाणी कपातीच्या निर्णयाचा शहर पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम होणार असून नागरिकांनी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून उपलब्ध होणारे पाणी पेयजल काटकसरीने वापरावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी केले आहे.
    माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरिभूमी प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या भित्तीपत्रकाचे (पोस्टर) प्रकाशन आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विजयकुमार मुंडे, श्रीकांत पवार, लक्ष्मीकांत साताळकर, आस्थापना विभागप्रमुख व माझी वसुंधरा अभियानाचे प्रमुख मेहेर लहारे, समन्वयक लक्ष्मण लांडगे, हरिभूमी प्रतिष्ठानचे अभय ललवाणी आदी उपस्थित होते.

    नागरिकांनी वाहने धुतांना, अंगणामध्ये सडा मारताना होणारा पेयजलाचा अपव्यय टाळावा, नादुरुस्त जलवाहिन्या दुरुस्त करून घेणे, गळके / टीपकणारे नळ दुरुस्त करून घेणे, पिण्यासाठी पेल्यात आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे, एक-दोन दिवसापूर्वीचे पिण्याचे पाणी टाकून न देता त्याचा इतर वापर करावा, वॉश बेसिनचा नळ गरजेपुरता वापरावा आदी उपाययोजना करून पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन डॉ. पंकज जावळे यांनी केले आहे.

    #Ahmednagar #Breaking #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर मनपा कामगार युनियनचे प्रभारी अध्यक्ष जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल यांनी स्विकारला पदभार
    Next Article परमपूज्य श्री. नरेंद्र महाराज यांच्या पादुका पूजन…
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.