Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»माझं लातूर, हरित लातूर’साठी शाळेतील पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण
    Maharashtra

    माझं लातूर, हरित लातूर’साठी शाळेतील पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

    newstoday24By newstoday24June 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    माझं लातूर, हरित लातूर’साठी शाळेतील पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

    • इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल, वृक्ष लावून
    • जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम
    • वरवंटी येथे विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक; जिल्हाधिकाऱ्यांनी केले सारथ्य

    लातूर जिल्ह्यात ‘माझं लातूर, हरित लातूर’ उपक्रमातून वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘शाळेतील पहिले पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता पाहिलेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आज शाळेच्या पहिल्याच दिवशी वृक्षारोपण करण्यात आले. आज दि.१५ शनिवारी लातूर तालुक्यातील वरवंटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग नोंदविला.

    शाळा प्रवेशोत्सव आणि वृक्षारोपणासाठी आयोजित कार्यक्रमात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी या बैलगाडीचे सारथ्य केले. शाळेच्या प्रवेशद्वारावर वाद्यांच्या गजरात शिक्षकांनी या मुलांचे औक्षण करून आणि गुलाबपुष्प देवून शाळेमध्ये स्वागत केले. या विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात नेवून त्यांची नाव नोंदणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी संवाद त्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देवून त्यांना विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे, असे सांगितले. तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले.

    इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातून, त्याच्या नावे शाळेच्या परिसरात एक झाड लावण्याचे, तसेच विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला या झाडाचाही वाढदिवस साजरा व्हावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये आज पहिल्याच दिवशी ‘विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील शाळांमध्ये जवळपास 16 हजार विद्यार्थी इयत्ता पहिलीत प्रवेश घेत असून त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरी यांनी यावेळी सांगितले.

    जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, वरवंटीचे सरपंच पवन जाधव, उपसरपंच राजेश पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवेश्वर लांडगे, उपाध्यक्ष रमा कांबळे, ग्रामसेवक अशोक लामदाडे, मुख्याध्यापक रामेश्वर गिल्डा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व पालक यावेळी उपस्थित होते.

    News today 24 असलम शेख लातुर,

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleकवठेमहांकाळच्या डॉ हर्षला कदम यांच्या मदतीने विद्यार्थिनीस मिळाले शिक्षणाचे बळ
    Next Article जून अखेरपर्यंत 75 टक्केपेक्षा अधिक पिककर्जाचे वाटप करा – पालकमंत्री संजय राठोड
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.