Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»अहमदनगर : अखेर तो मुलगा मिळाला… मुलांशी संवाद साधा, त्यांच्याशी प्रेमाने वागा नाहीतर होईल ‘पश्चाताप’
    Ahmednagar

    अहमदनगर : अखेर तो मुलगा मिळाला… मुलांशी संवाद साधा, त्यांच्याशी प्रेमाने वागा नाहीतर होईल ‘पश्चाताप’

    newstoday24By newstoday24January 14, 2024No Comments3 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर : मुलांशी संवाद साधा, त्यांच्याशी प्रेमाने वागा नाहीतर होईल ‘पश्चाताप’

    अखेर तो मुलगा मिळाला..

    वडिलांच्या भीतीपोटी कमी कालावधीत कार्तिकचा थक्क करणारा प्रवास

    नगर : घरातील वातावरणाचा मुलांवर कसा परिणाम होतो? मुलांच्या मनात भीती निर्माण झाल्यावर कोणती टोकाची भूमिका घेतात? प्रसंगी स्वतःचे नाव बदलून घरापासून कायमचा निरोप घेण्याचा विचार कशी करतात? अशा नानाविध अनुत्तरित प्रश्नांनी भरलेला एका कार्तिक (बदललेले नाव) नावाच्या शाळकरी विद्यार्थ्याच्या नाट्यमय प्रवास मानवी मनाला भेदणारा आहे.

    कार्तिक पंधरा दिवसांपासून शाळेत गेलाच नाही त्याने आपल्या मित्रांसोबत फिरण्यात वेळ घालवला. शाळेतून कर्तिकच्या गैरहजेरीबाबत त्याच्या घरी कळवण्यात आले.ही बाब कार्तिकला समजल्याने आता आपल्याला वडील मारतील? या भीतीने घरी न जाता आई काम करत असलेल्या एका हॉस्पिटल येथून थेट नगरच्या रेल्वे स्थानकावरून बिहार रेल्वेने कोपरगावपर्यंत गेला.गाडीत बिहारी नागरिक मारतील या भीतीने तिथून रेल्वेने पुण्याला गेला.पुण्यात त्याला घर सोडून आलेले आणखी तिघे भेटले.सर्वजण ठरवून पुन्हा कोल्हापूरला गेले.वैभव हा रेल्वेने तिथून मडगांव गोवा या ठिकाणी गेला.

    त्याठिकाणी नाश्ता करण्यासाठी त्याकडे पैसे नसल्याने हॉटेल मालकाने चौकशी केली.त्यावेळी त्याने अहमदनगर येथून पळून आल्याचे सांगितले. हॉटेल मालकाने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली.पोलिसांनी ताब्यात घेत त्याला अपना घर होस्टेल येथे दाखल केले.मात्र हॉस्टेलमधल्या मुलांनी त्याला सांगितले की, खरे नाव सांगितल्यावर ४-५ महिने येथेच थांबवतील पण खोटे नाव सांगितल्यावर २-३ दिवस शोध घेतील व सोडून देतील म्हणून त्याने आपले नाव वैभव बनकर असे सांगितले.’अपना घर’ येथे असताना कार्तिक आणि त्याच्या मित्रांना काही विधी संघर्षग्रस्त मित्रांकडून त्रास होत होता त्यामुळे त्यांनी बाल कल्याण समिती बोर्ड बसल्यावर तक्रार केली होती.

    त्यानंतर त्यांना मातृछाया बालकल्याण आश्रम फोंडा गोवा येथे दाखल करण्यात आले. तेथुन कार्तिक आणि त्याचे 3 मित्र पळाले. कार्तिक दि.९ जानेवारी रोजी दादर रेल्वे स्टेशन मुंबई येथे आला. दादर पोलिसांनी वैभवला बाल कल्याण समिती मुंबई येथे हजर करून डेव्हिड ससून औद्योगिक शाळा माटुंगा येथे दाखल केले. तो दादर येथे असल्याबाबत कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली. दि.११ जानेवारी रोजी पत्रव्यवहार करून कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्याला पेढे भरवून त्याचे स्वागत केले. कार्तिक ने पुन्हा असे कधीच वागणार नाही अशी ग्वाही दिली.

    मुलांच्या मनात पालकांचे विषयी आदरयुक्त भीती असावी- पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

    सर्वाधिक शोध आम्ही या मुलाचा घेतला. आई वडील नसल्यावर काय अवस्था होते याची प्रचिती कार्तिक ला आली आहे. त्याचे काही अल्पवयीन मित्रांनी पैशासाठी चोरी केली होती त्यांची वेळीच साथ सोडली. आई वडील सुद्धा मुलाच्या चांगल्यासाठी रागवतात मारतात परंतु मुलांच्या मनामध्ये आदरयुक्त भीती असावी फक्त माराची भीती नको.

    मुलांशी चर्चा,मैत्री करा,एकरूप व्हा!

    माझी सर्व पालकांना विनंती आहे मुलांवर बाहेरचा ताण काढू नये.त्यांना वेळ द्या, मैत्री करा, त्यांचे म्हणणे जाणून घ्या.आपल्याशी बोलताना संकोच वाटणार नाही एवढे त्यांच्याशी एकरूप व्हा.आपल्या वागण्या बोलण्यात त्यांच्या मनावर परिणाम होतो.आपल्याबाबत भीती निर्माण होऊन ती वेगळाच निर्णय घेतात. त्यामुळे आपण आणखी खचून जातो.
    ~ कर्तिकचे वडील

    मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे पोलीस जवान संदीप पितळे योगेश भिंगर्दिवे सलीम शेख अमोल गाडे यांचे सोबतच मुलाचे आई वडील यांनीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते.

    #crime #nagarpolice #ahmednagar #newstoday24ahmednagar #pichandrashekaryadhav
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleपत्रकारांचे प्रश्न न सोडवणाऱ्या सरकारच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहील, एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन
    Next Article Bigg Boss 17 Winner : Munawar Faruqui बिग बॉस १७ च्या विजेत्याची घोषणा; मुनव्वर फारुकीने कोरलं ट्रॉफीवर नाव!
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे हटवणार

    February 12, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.