Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी व मा. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यानिमित्त ह भ प पुंडलिक जंगले महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन संपन्न.
    Ahmednagar

    जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी व मा. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यानिमित्त ह भ प पुंडलिक जंगले महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन संपन्न.

    newstoday24By newstoday24March 30, 2024No Comments3 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी व मा. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यानिमित्त ह भ प पुंडलिक जंगले महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन संपन्न.

    संसारात आपली कुटुंब व्यवस्था करत असताना इतर लोकांचे न ऐकता आपली कुटुंब व्यवस्था चालवावी – ह भ प पुंडलिक जंगले महाराज शास्त्री

    नगर : मनुष्याने कोणतेही काम करत असताना त्या कामांमध्ये ध्येय ठेऊन काम केल्यास ते काम सिद्धेश किंवा फळास जाते. त्या कामांमध्ये एक-एक पायरी पाहणं किंवा एक-एक पायरी आपल्या मनात बसवणं म्हणजेच वेड होणं प्रपंचात परमार्थ व इतर जी माणसं कोणालाही कुठेही उत्तर द्यायला तयार होतात ती माणसं आपला अज्ञानाचा परिचय करून देतात. जी माणसं सुज्ञ असतात जी जाणारी असतात ती माणसं आपल्या कामांमध्ये कमी बोलतात आणि लोकांना उत्तर देण्यापेक्षा आपले दोन बोटं घ्यायची आणि दोन्ही कानात घालायचे जो मनुष्य परमार्थ करतो त्याने जर आपली बोटं कानात घालून परमार्थ केला तर त्याचा परमार्थ यशस्वी होतो. संसारात आपली कुटुंब व्यवस्था करत असताना इतर लोकांचे न ऐकता आपली कुटुंब व्यवस्था चालवणं.दोन बोट आपल्या कानात घालून केलेला संसार उत्तम ठरतो हे सर्व न करता जी माणसं उत्तर द्यायला लागली ती माणसं लगेच बरबाद होतात. तुकाराम महाराजांनी कधी लोकांना उत्तर दिले नाही स्वतःचा परमार्थ सिद्धीस नेला आणि जो लोकांचे उत्तर देण्यात जातो त्याचे जीवन तसेच राहून जाते. हजार लोकांचे हजार प्रश्न असतात त्या सर्वांचे उत्तर देण्यात आपले जीवन निघून जाते ज्या मनुष्याला लोकांनी केलेली निंदा थोडीही सहन होत नाही ती मनुष्य परमार्थ किंवा राजकारण किंवा इतर गोष्टी करू शकत नाही. जसे गौळण भगवान श्रीकृष्णाचे भजन करू लागली त्यावेळी लोक तिच्यावर समाज हसू लागले तिला बोलू लागले त्यावेळी तिने दोन बोट आपले कानात घातले आणि भगवंताचे भजन करू लागली. त्या लोकांकडं लक्ष दिलं नाही त्यामुळे तिचा परमार्थ सिद्धेश गेला ते तुकोबाराय सांगतात तुका म्हणे हासे जण || नाही कान तया ठाई || याप्रमाणे या वृत्ती प्रमाणे जर आपण काम करत असताना इतर लोकांकडं लक्ष न देता आपलं कामावर आपलं लक्ष दिलं तर आपलं ते काम सिद्धेश किंवा पूर्णतेकडे जातो. असे प्रतिपादन जंगले महाराज शास्त्री यांनी केले.
    जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी व मा. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यानिमित्त ह भ प पुंडलिक जंगले महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले यावेळी मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले,भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर, माजी नगरसेवक रामदास आंधळे, वसंत लोढा आदींसह नागरिक भक्तगण मोठ्या संखेने उपस्थित होते.

    मा.महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, संत तुकाराम महाराज यांच्या बीजे निमित्त सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या माध्यमातून समाजामध्ये अध्यात्मिकता व धार्मिकतेचे प्रबोधन होत असते या कार्यक्रमासाठी नागरिक सात दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. असे ते म्हणाले.

    #Ahmednagar #Breaking #News
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंके यांचा विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा
    Next Article छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना समाजात मानाचे स्थान व प्रगती व्हावी यासाठी विशेष असे कार्य केले – आ.संग्राम जगताप
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    नगर ब्रेकिंग : धडा वेगळ मुंडके,एक पाय बाजूला अनोळखी तरुणाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला उलगडा 

    March 16, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.