Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन
    Maharashtra

    लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन

    newstoday24By newstoday24May 27, 2024Updated:May 27, 2024No Comments3 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्याला एक वेगळी ओळख निर्माण करवून दिली-राजकिशोर मोदी

    लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन

    अंबाजोगाई(प्रतिनिधी):- देशाचे माजी अवजड उद्योग मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व विलासरावजी देशमुख यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याच्या जडणघडनेला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते असे परखड मत अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले. ते लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सहकार भवन येथे त्यांना आदरांजली वाहताना बोलत होते. याप्रसंगी राजकिशोर मोदी यांच्या समवेत माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा,माजी नगरसेवक महादेव आदमाणे, अमोल लोमटे, दिनेश भराडीया, सुनील व्यवहारे, बबन पानकोळी, सुभाष कोळी, खयामोद्दीन काझी,जमादार पठाण, गोविंद पोतंगले, विष्णू पांचाळ, गणेश मसणे, विजय रापतवार, शाकेर काझी, विशाल पोटभरे, सचिन जाधव, जावेद गवळी, मतीन जरगर,कैलास कांबळे, महेश कदम, आकाश कऱ्हाड, रोहन कुरे, विशाल जगताप, शाहिद शेख,महेश वेडे,शेख जावेद, आशिष ढेले, संतोष चिमणे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
    यावेळी सर्वप्रथम स्व विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर उपस्थित सर्वांनी पुष्पांजली अर्पण करून स्व विलासराव देशमुख यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात विशाल जगताप यांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.पराभवाला न ढळता फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी कशी घ्यावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्व विलासराव देशमुख हे आहेत असे स्पष्ट मत विशाल जगताप यांनी मांडले. विधानसभे पाठोपाठ विधान परिषदेला देखील निसटता पराभव स्वीकारून देखील त्यांनी उमेद न सोडता पुन्हा नव्या उमेदीने सामोरे जाऊन महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून स्व विलासराव देशमुख हे राहिले होते. तेव्हा त्यांच्याकडून कुठल्याही पराभवाला कवटाळून न बसता त्याचा खिलाडू वृत्तीने स्वीकार करून पुढे गेले पाहिजे हीच शिकवण आपणास स्व विलासराव देशमुख यांच्याकडून घेण्याजोगी असल्याचे देखील विशाल जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले.
    लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहताना राजकिशोर मोदी यांनी विलासराव देशमुख यांच्या जीवनपटला उजाळा दिला. त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास आपण जवळून अनुभवल्याचे मोदी यांनी सांगितले. विलासराव देशमुख यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात बाभूळगाव ग्रामपंचायत सदस्य पदापासून केल्याचे नमूद केले. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास अतिशय वाखाणण्याजोगा व इतरांनी त्यातून बरच काही शिकण्यासारखेच आहे.
    अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देतांना विलासराव देशमुख यांनी नेहमीच झुकते माप दिल्याचे यावेळी राजकिशोर मोदी यांनी आवर्जून उल्लेखित केले. त्यांनी दिलेल्या निधीच्या बळावरच आपण अंबाजोगाई शहरात विकास कामे करू शकल्याची कबुली मोदी यांनी दिली. लातूर बरोबरच त्यांनी अंबाजोगाई शहरासाठी देखील विकासाची गंगा ज्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास, वैधानिक विकास महामंडळ या व अशा विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्याचे राजकिशोर मोदी यांनी आवर्जून सांगितले. मराठवाड्याचा राजहंस काळाने आकस्मिक पणे हिरावून नेला. त्यांच्या आकस्मित जाण्याने केवळ मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचे याप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleवाघाळा येथे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पुर्व मार्गदर्शन
    Next Article चक्री वादळात ३३ केव्हीची पाच पोल जमीनदोस्त ;मोठी जीवीत हानी टळली.
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.