Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»केरळच्या सिंधू पणीकर (नवगिरे) यांना आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार 15 ऑगस्ट रोजी सन्मानपूर्वक वितरण
    Maharashtra

    केरळच्या सिंधू पणीकर (नवगिरे) यांना आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार 15 ऑगस्ट रोजी सन्मानपूर्वक वितरण

    newstoday24By newstoday24July 3, 2024Updated:July 3, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    केरळच्या सिंधू पणीकर (नवगिरे) यांना आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार 15 ऑगस्ट रोजी सन्मानपूर्वक वितरण

    आंबाजोगाई- दर वर्षी 15 ऑगस्ट रोजी दिला जाणारा आंतरभारतीचा स्नेहसंवर्धन पुरस्कार यंदा केरळची कन्या सिंधू पुरुषोथमन पणीकर (नवगिरे) यांना दिला जाणार आहे.
    अन्य प्रांतातून येऊन आंबाजोगाईत वास्तव्य करणाऱ्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर टाकणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.
    श्रीमती सिंधू ह्या केरळच्या कोट्यायम जिल्ह्यातल्या. बी एस्सी नरसिंग करून आंबाजोगाईत आल्या. सुरुवातीला मानवलोक मध्ये काम केले. नंतर एम आय टीत सेवा दिली. तेथेच मारुती नवगिरे यांचा परिचय झाला. त्यांनी आंतर प्रांतीय व मानवी विवाह केला. पुढे त्यांनी बी एड करून एम आय टीच्या सरस्वती विद्यालयात सहशिक्षिकेची नोकरी पत्करली. श्रीमती सिंधू यांनी इंग्रजीत एम ए केले आहे. त्यांची दोन्ही मुले पुण्यात शिक्षण घेत आहेत. केरळची कन्या आंबाजोगाईची सून आहे म्हणून तिचा सन्मान करणे आंबाजोगाईकरांचे कर्तव्य ठरते. याच भावनेने हा पुरस्कार दिला जात आहे.
    मानकरी 2014ला प्राचार्य बी आय खडकभावी यांचा सन्मान करून स्नेहसंवर्धन पुरस्कार सुरू करण्यात आला होता. त्यानंतर मनीष स्वीटचे शशिकांत रूपडा (गुजरात), प्राचार्य महावीर शेट्टी (कर्नाटक), मेवाडचे शंकरजी मेहता (राजस्थान), आनंदराव अंकम (तेलंगण), उडपी हॉटेलच्या सुशीलाताई शेट्टी (कर्नाटक), सिमेंटच्या वस्तूंचे निर्माते शेख शमीम (उत्तर प्रदेश), लाकडी काम करणारे राजू जागींड (राजस्थान), टायर रिमोल्ड करणारे अजिथकुमार कुरूप (केरळ), वाचमनचे काम करणारे नरपती कुंजेडा (नेपाळ) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. एकमेव शहर अन्य प्रांतातून येऊन स्थायिक झालेल्या व शहराच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्याची परंपरा आंबाजोगाईने सुरू केली आहे. या मागे ‘हम सब एक हैं’ ही राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करण्याचा विचार आहे.

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleपंजाब कडून नांदेडला जात असताना इनोव्हा ची ट्रकला धडक , ४ भाविकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू.
    Next Article ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.