Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»मागील वर्षी अतिवृष्टीचे अनुदान शेतकर्यांना के.वाय.सी करून मिळेना….तहसील कार्यालयाचा दशक्रिया विधी घालण्याचा ईशारा
    Ahmednagar

    मागील वर्षी अतिवृष्टीचे अनुदान शेतकर्यांना के.वाय.सी करून मिळेना….तहसील कार्यालयाचा दशक्रिया विधी घालण्याचा ईशारा

    newstoday24By newstoday24February 24, 2024Updated:February 24, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मागील वर्षी अतिवृष्टीचे अनुदान शेतकर्यांना के.वाय.सी करून मिळेना….तहसील कार्यालयाचा दशक्रिया विधी घालण्याचा ईशारा

    नेवासा प्रतिनिधी।मागील वर्षी 2022-23 अतिवृष्टीने नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे कपाशी,तुर,बाजरी,मका,व फळ बाग या व इतर पिकांचे नुकसान झाले होते,सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते परंतु बिनकामाच्या तहसीलदार साहेब यांच्या अनागोंदी आणि भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहिले होते.वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी यासाठी जीवन ज्योत फाउंडेशनने वंचित शेतकऱ्यांना सोबत घेऊन दोन वेळेस आंदोलन केलेले आहे. दोन वेळेस आंदोलन केले तेव्हा कुठे झोपलेल्या कर्तबगार तहसीलदार साहेबांना जाग आली आणि तालुक्यातील 22 गावातील शेतकर्यांचे यादी मध्ये नाव आले.सदर यादी मध्ये शेतकर्यांचे नावे आले, शेतकऱ्यांनी के.वाय.सी करून 25 दिवस उलटुन गेले परंतु नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम खरच मिळणार आहे का असा मोठा प्रश्न पडला आहे.जर येत्या आठ दिवसात उर्वरित शेतकऱ्यांची हक्काची नुकसान भरपाई रक्कम तहसीलदार साहेबांनी तातडीने संबंधितांच्या बँक खात्यात जमा करून योग्य ते पावले उचलावीत अन्यथा नाविलाजास्तव प्रशासनाच्या विरोधात जीवन ज्योत फाऊंडेशन च्या वतीने भेंडा येथे सकाळी तहसील कार्यालयाचा दशक्रिया विधी आंदोलन करण्यात येईल.व त्याच दिवशी माननीय तहसील साहेब यांचे पीढ दान करून आंदोलन करण्यात येईल. काही अनुचित प्रकार घडला, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला तर त्याला संबंधित शासकीय यंत्रणा आणि त्या विभागातील अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले या वेळी शेतकरी जनआंदोलक कमलेश नवले पाटील,छत्रपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर,आप्पासाहेब आरगडे,जैद शेख,अक्षय बोधक,प्रदिप आरगडे,राहुल कांगुणे,अक्षय आरगडे,अभिजीत बोधक,प्रकाश मुळक,प्रदिप जाधव,बाबासाहेब चामुटे,संभाजी आरगडे यांच्यासह अनेक शेतकरी व सहकारी उपस्थित होते.

    #ahmednagar #newsupdate
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleकेडगाव शास्त्रीनगर दत्त मंदिर परिसरातील सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न
    Next Article सहाय्यक कामगार आयुक्त व जिल्हा प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर एमआयडीसी येथील ईटन कंपनीतील कामगारांचे उपोषण मागे
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे हटवणार

    February 12, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.